Shantanu Kulkarni | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Feb 2023, 1:51 pm

Embed

पहाटेच्या शपथविधीबाबत सातत्याने होणाऱ्या नवनव्या दाव्यांमुळे कायमच चर्चा रंगतात. नुकतंच देवेंद्र फडणवीसांच्या नव्या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यावर, अनेक चर्चा रंगल्या नंतर आता खुद्द शरद पवारांचीच सूचक प्रतिक्रिया आली आहे. पहाटेचा शपथविधी झाला म्हणूनच राष्ट्रपती राजवट उठली आणि तर उद्धव ठाकरे..मुख्यमंत्री झाले, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. पहाटेच्या शपथविधीचा फायदाच झाला, राष्ट्रपती राजवट उठली, असं पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवडचे मविआ उमेदवार नाना काटेंच्या प्रचारार्थ पवार आज (२२ फेब्रु.) पुण्यात होते.



Source link